आधी हाताला चटके….

मी आणि कौस्तुभ आमचे सामाजिक वजन वाढवण्याचे प्रयत्न गेली अनेक वर्षे करत आहोत. पण त्यात अजून फारसे यश न आल्याने आम्ही मग शारीरिक वजनाकडे मोर्चा वळवला आणि ‘जाऊ तिथं खाऊ’ हे ब्रीदवाक्य मनाशी धरून जागोजागचे प्रसिद्ध पदार्थ खाऊन बघितले. यातूनच प्रत्यक्ष खाण्याबरोबर खाण्याविषयी वाचणे आणि लिहिणे ही आवडही आमच्यात निर्माण झाली. यातूनच एक पुस्तक माझ्या हाती लागलं. आणि मग त्याविषयी तुम्हाला सांगायचं म्हणून हा लेखही बसल्याबसल्या सहज हातातून उतरला.

१८७५ साली राजमान्य राजश्री रामचंद्र सखाराम गुप्ते नावाच्या एक गृहस्थांनी ‘सुपशास्त्र’ अर्थात स्वयंपाकशास्त्र हा ग्रंथ लिहून सिद्ध केला. या पुस्तकात त्यांनी तत्कालीन मराठी पदार्थांची यादीच प्रसिद्ध केलेली आहे. अर्थात यातले सुमारे ८०% पदार्थ आपण आजही खात/करत असतो पण मला यातल्या पदार्थांबरोबरच त्या काळातली भाषा आणि लिहिण्याची पद्धत तितकीच आवडली.

विद्या प्रसारक मंडळ

यातली पदार्थांची यादी वाचून हे पुस्तक ब्राह्मणी अथवा उच्चवर्गाच्या आहारातील पदार्थांविषयीच आहे असा निष्कर्ष नक्कीच काढता येईल पण हे पदार्थ थोड्या फार फरकाने समाजातला एक मोठया भागाच्या रोजच्या आहारातले होते ही बाब लक्षात…

View original post 630 more words

बंगळूर बद्दल माझे मत

माझ्या मित्राच्या साखरपुड्याचा निमित्ताने आम्हाला बंगळूर ला जाता आलं. तसं ह्या पूर्वीसुद्धा मी एकटा ऑफिसमधून बंगळूर ला आलो होतो पण त्यावेळी फिरणं वगैरे तसं काही झालं नाही. ह्या वेळी मात्र मनसोक्त शहर पाहिलं.

शहर तसं मुंबई सारखंच. सर्वाथाने आपलेपण जपलेलं आणि उत्क्रांत झालेलं..इथल्या बऱ्याच गोष्टी मला आवडल्या आणि तत्क्षणी महाराष्ट्रात अश्या गोष्टी का  नाहीत ह्याची खंत सुद्धा वाटत होती. ह्यातुनच मी कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांच्या राजधान्या आणि राज्यांची तुलना करण्यास उद्युक्त झालो.

शहरात मुख्यतः जवळपास सर्वच रस्ते दुपदरी आहेत. मुंबई सारखी लोकल ट्रेन इथे नाही, पण वाहनांची रहदारी मात्र तशीच.. त्यामुळे गाड्या आणि राज्यवाहतुक मंडळाच्या बस हेच ये-जा करण्याचे साधन आणि बरेच रस्ते हे one way आहेत. त्यामुळे ट्राफिक कमीतकमी व moving असतं. ( हा माझा अनुभव सुटी्चया दिवसांतील असल्यामुळे प्रत्यक्ष रोजचा अनुभव नक्कीच वेगळा असू शकतो). रस्त्याच्या दुतर्फा झाडे असतातच.. शहरात झोपड्या क्वचितच दिसतील. रस्त्यावर कचरा करणारी मंडळी निदान मी तरी पहिली नाहीत. शहराच्या आत सुद्धा भव्य अशी cubbon parkbangalore botanical garden आहेत.. त्यामुळे शहरातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मदत होते.

शहराची मुख्य भाषा कन्नड. सर्वच्या सर्व कामकाज हे कन्नड ला प्राधान्य देऊनच केलं जातं आणि पर्यायी भाषा म्हणून इंग्रजी भाषा आहे. जे लोक पर्यटन व त्या संबंधित व्यवसायांशी निगडित आहेत त्यांना थोडीफार हिंदी येते, अगदी ते सुद्धा प्रयत्न करून बोलतात. एक गोष्ट आवर्जून मला जाणवली किंवा हे माझं मत होऊ शकेल की त्यांना हिंदी बोलता जरी येत असली तरी व्यवहारात त्यांनी हिंदीला कधीही मान्यता दिली नाही. म्हणजे गरज असल्यासच तिथे हिंदी बोलतील तीही तुटक..त्यातही कन्नड भाषेचे शब्दछटा दिसून येतातच. आपण मात्र महाराष्ट्रात हिंदीला आपल्या उरावर बसवलं, त्यामुळे मराठी महाराष्ट्रातील व्यवहारातुन जवळपास संपत चालली आहे व तिची जागा इंग्रजी आणि हिंदी घेत आहे.. वेळीच जर तिचे पुनरुत्थान करू शकलो नाही तर महाराष्ट्र आपली राजधानी तर गमावेलच पण हळू हळू आपली भाषा,आपली संस्कृती सुद्धा गमावून बसेल.

इथे प्रत्येक शाळेत अगदी ती आंतरराष्ट्रीय बोर्ड असली तरीही कन्नड भाषेचे शिक्षण अनिवार्य आहे. दुकानाचे फलक, तिथल्या उद्घोषणा हे सर्वच कन्नड भाषेतच असते. अगदीच पर्यायी भाषा म्हणून इंग्रजी सापडते. पण इथे महाराष्ट्रात कुठलही सरकार असो त्यांची मराठी बाबतची उदासीनता कायम असते. ह्या उलट आत्ताच सरकार मराठी-विरोधी पाऊल उचलतानाच जास्त दिसते तरीही मराठी मनांना जाग मात्र येत नाही. आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर जवळपास सर्वच भाषण व इतर सर्व पर्यायी social networks वर हिंदीलाच प्राधान्य देतात. असे कितीतरी मुद्दे आहेत ज्यांच्या बद्दल रोजच वेगवेगळ्या पद्धतीने निषेध करून सुद्धा आत्ताच सरकार त्याला दाद देत नाही.

सरकारी- निमसरकारी किवा विनासरकारी सर्वच संस्थांमध्ये कन्नड भाषेलाच प्राधान्य दिलं जात. अगदी आम्ही मॉल मध्ये कपडे खरेदी करायला गेलो तर तिथे सर्व जाहिरात सुद्धा सुंदर कन्नड भाषेतच होती. मध्ये मध्ये वाजणारी गाणी सुद्धा superb hot कन्नड गाणी.. एका -दोघांना वस्तूंबद्दल माहिती इंग्रजीतून विचारली तरीही त्यांनी उत्तरं कन्नड मधूनच दिली. मी नम्रपणे त्यांना म्हणालो की मला कन्नड येत नाही कृपया हिंदी किंवा इंग्रजीत सांगता येईल का? तर तिने चक्क नाही म्हटलं. मग माझ्या पत्नीने तिला इंग्रजीतून सांगितलं की तू बोल कन्नड मधून, आम्ही बघतो प्रयत्न करून काही कळतंय का? मग तिने सांगितलेली कन्नड माहिती त्यातले शब्द जुळवून जुळवून जे काही कळलं ते थोडंफार आम्ही समजलो.. हे असे बऱ्याच जागी घडले.. एकदा तर हॉटेल मध्ये जेवायला गेलेलो. तिथे counter वर बरीच गर्दी होती त्यातील इका माणसाने पलीकडील वाडप्याला coupon दिले व कन्नड मध्ये काहीतरी म्हणाला, पण तो समोरचा ढिम्म.. मग हयाने पुन्हा “Are you not kannadiga?”असा प्रश्न केला, तरी त्याला कळलेलं काही दिसलं नाही. शेवटी ती व्यक्ती डाफरली तशी पलीकडून दुसऱ्या एका वाडप्याने त्याला उत्तर दिले.. हे बघून मी गार च झालो. पण मला त्यांचा राग अजिबात आला नाही उलट त्यांचा हेवा वाटला, ही अशी मानसिकता आपल्याकडे देखील आली तर काय धमाल येईल.

प्रादेशिक संकुचितपणा ही महाराष्ट्राची ओळख नाही. हे राज्य नेहमीच भारताचं खड्ग-हस्त राहील. पण त्यासाठी आपलं स्वत्व टिकवणं अत्यंत गरजेचे आहे. वरील थोडेफार चांगले गुण जरी आपण मिळवले तरी आपण मराठी भारतीय म्हणून पुन्हा नाव उज्ज्वल करू. मराठी मुलांना त्यांच्या भाषेच्या आधारावर कामं मिळतील. इतर भाषेतून प्रादेशिक परीक्षा देण्याची गरज भासणार नाही त्यामुळे ते आपले विचार उत्तम प्रकारे मांडू शकतील. तसेच डोक्यावर बसून मिऱ्या वाटणाऱ्या परप्रांतीयांना चाप बसेल. असे अगणित फायदे होतील..

जसे महाराष्ट्रात महाराज हे प्रत्येक मराठी मनाचे आराध्य दैवत तसे कर्नाटकात बऱ्याच कन्नड लोकांना टिपू सुलतान आणि वडियार घराणे ह्याबद्दल नितांत प्रेम. वास्तविक पाहता टिपू सुलतान चा खरा इतिहास ह्या लोकांपर्यंत पोहोचवला जात नाही की लोकांनीच त्याची नराधमी कृत्ये स्वतःहून पुसून टाकली ह्याचा अर्थ लागत नाही. आणि वाडीयार घराणे तर तेथील संस्थानिक.. त्या पलीकडे त्यांचे योगदान निदान माझ्या वाचनात तरी नाही. असे असून सुद्धा त्यांचे वाडे, राजवाडे व तेथील इतिहास ह्याचे जतन कर्नाटक सरकार करते; इतकाच नाही तर त्यातूनच तेथील लोकांना अर्थकारण उपलब्ध करून दिले आहे. पण ह्या उलट ज्या महाराष्ट्राने आदर्श शासन, आदर्श राजा, लोकहितवादी हिंदवी साम्राज्य उभं करून लोकशाही आणि स्वतंत्र असा कानमंत्र सर्व भारतीयांच्या मनामनात रुजवला त्यांच्या इतिहासाचा वापर आज फक्त मते मिळवण्यासाठी, समाजात दुही माजवण्यासाठी केला जातो. त्यांच्या गडकिल्ल्यांची तर विचारणा करू नये इतकी दुरावस्था झाली आहे.

मैसूरला आम्ही तिथल्या चामराजेंद्र प्राणिसंग्रहालयात गेलो. इथे भारतातील जवळपास सर्वच प्राणी, पक्षी पाहायला मिळतील. पण ह्यातील वेगळेपण म्हणजे हे सर्व प्राणी कुठल्याही पिंजऱ्यात बंधिस्त न ठेवता त्यांना त्यांचे एक वेगळे असे परिसंस्था (Eco-System) दिलेले आहे जेणेकरून प्राण्यांना मानवी उपद्रव सहन करता लागू नये. त्यात आतमध्ये प्राण्यांना सुद्धा तुम्हीं दत्तक घेऊ शकता अशी प्रक्रिया राबवली जाते. जेणेकरून प्राण्यांबद्दल मनात आपुलकी निर्माण व्हावी. प्राण्यांचे इस्पितळ सुद्धा आहे. आतील रस्त्यांची आखणी इतकी व्यवस्थित कि तुम्हाला प्रत्येक प्राणी अगदी व्यवस्थित पाहता येतो व त्याची माहिती सुद्धा वाचता येते. हे असे सुदर संग्रहालय महाराष्ट्रात का नाहीत. इथल्या राणीची बाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या प्राण्यांना अगदी लहानश्या पिंजऱ्यात डांबून कोंडून ठेवतात. तिथे समोर उभे राह्ल्यावर दुःर्गंधीनें माणसाचा सुद्धा श्वास गुदमरतो तिथे प्राणी कसे जगत असतील देवच जाणे.

Business Process and Services बद्दल म्हणायचं तर तिथेही बंगलोर व तेथील सकारात्मक सरकार हे दोघेही अव्वल ठरतात. ह्या शहरात बऱ्याच मोठ्या प्रमाणात तेथील नवीन पिढीने सुरू केलेले start ups आहेत, IT tech hub आहे.. सर्वांगीण विकास दिसून येतो. Service sector चा एक किस्सा सांगतो. आम्ही बंेगलोर ते मैसूर बस ने जाण्याचे ठरवले. अंतर जवळपास १५० किमी (सुमारे ३-४ तास). ३०० रुपयात अगदी व्यवस्थित खूप जबरदस्त अशी sleeper coach बस व रस्त्यात snacks आणि पाणी सुद्धा पुरविण्यात आले.. हे असे मुंबईकरांना मिळाले तर दिव्यच.. आनंदाश्रू थांबणार नाहीत😁😁.

तसे महाराष्ट्राचे- कर्नाटक सरकार सोबत आधीपासून मतभेद आहेत. त्यांची बरीच कारणं- संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अजूनही मागे राहिलेले बेळगाव, निपाणी सारखी गावं, सीमाभागातील मराठी विरुद्ध कानडी वाद, कावेरी प्रश्न, व असेच बरेच काही.. पण तरीही महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेतच.

 

 

 

 

माझी उंबरखिंड- सुधागड ट्रेक

Umbarkhind and Sudhagadमाझी हि तशी दहावी ट्रेक असावी. ट्रेक साठी मी नेहमीच तयार असतो त्यात गडकिल्ले म्हटल्यावर तर excitement ला माझ्या पार नसतो. ह्या वेळी चक्क भावाची सॅक घेऊनच सुरुवात केली. शिवशौर्य तुन अमितदादा ने सांगितलं होतं की ९ वाजता सर्वांनी भेटायचं नेहमीच्या ठिकाणी.. परळला; त्यामुळे ठरवलं की ऑफिसमधून थेट परळ लाच जायचं. मग आदल्या रात्री बॅग भरायचे उपाद्व्याप सुरू झाले. जवळ जवळ १० वाजले असतील ऑफिस मधून माझ्या boss चा फोन. आमचा एक app दुसऱ्या दिवशी live जाणार होता. तशी सर्व टेस्टिंग आधीच संपली होती पण अचानक issue दत्त म्हणून येतोच. ते संपेपर्यंत जवळजवळ ११ वाजले. आमच्या सौ ना बरं नव्हतं तर त्या आधीच गाढ झालेल्या☺ मग मी पण तशीच अर्धवट तयारी करून झोपलो म्हटलं दुसऱ्या दिवशी लवकर उठून करेन. ट्रेक चा दिवस उजाडला. मी झपाझप ५.३० ला उठून सकाळची तयारी आटपून मग बॅग भरून घेतली. ही असली बॅग घेऊन ऑफिस ला जाण्यासाठी कांदिवलीहुन ८.१४ पकडणं, म्हणजे लय भारी कसरत. पण आता ठरवलं तर मागे फिरणं नाही. मग ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे काम आटपून ७.३० पर्यंत कसाबसा वेळ काढून निघालो. कुर्ल्या ला पोहोचल्यावर कळलं की ट्रेन उशिरा आहेत 😫😡 मग काय कसाबसा मारामारी करत ट्रेन मध्ये चढलो. तिथून दादर- परळ गाठलं. उतरल्यावर एक मैत्रीण भेटली तिच्यासोबत थोडं हॉटेल मध्ये खाऊन आमच्या ट्रेक च्या बसमध्ये जाऊन बसलो आणि प्रवास सुरु झाला💙
रात्री १ च्या आसपास आम्ही कुरवंडे येथे पोचलो. तेथे एका मंदिरात आश्रय घेतला. थोड्या गप्पा झाल्यावर सर्व तयारी करून गाढ झोपी गेले त्यातही कोणी त्यांच्या झोपेचा सूर लोकांना ऐकवत होते आणि इतरांची झोप घालवत होते. अचानक कुणाचातरी फोन वाजला बघतो तर ६ वाजले होते😞 मग कंटाळत कंटाळत उठून तयारी सुरू केली. माझ्या मैत्रिणीचा एक बूट चक्क कुत्र्यांनी पळवला त्याची शोधाशोध झाली.. तो एका चाणाक्ष मित्राने लांबूनच हेरला. मग बॅग वगैरे भरून, चाह- बिस्कीट घेऊन आम्ही ट्रेक सुरू केला, तेव्हा जवळजवळ ७.३० वाजले होते.
सह्यांचल हा असाही स्वतःच एक अभेद्य किल्ला. घाटमाथ्यातून, डोंगरातून, रानावणातून रस्ता काढत कधी चुकत कधी विचारत आम्ही पुढे पुढे जात होतो. मध्ये मध्ये थांबून शार्दूल दादा आम्हाला उंबरखिंडीच्या लढाईचे महत्व आणि इतिहास सांगत होता. ते ऐकताना सोबत भौगोलिकता समजून घेता येत असल्यामुळे त्या काळात नेमकी कशी लढाई झाली असेल त्याचा अंदाज लावता येत होता.. एका ठिकाणी काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून एका सावली शेजारी सर्वच स्थिरावले. मग कुणाचे ब्रेड-जॅम, अंडी, तर कुणाचे कोळंबी मसाला आणि श्रीखंड बाहेर आले. ह्या सर्वांवर एक मस्त ताव मारून झाला आणि मंडळी पुढच्या वाटेल लागणार इतक्यातच मुद्रा खेळता खेळता पडली.
IMG_20180224_171923.jpg
मुद्रा म्हणजे शार्दूल दादाची जेमतेम ७-८ वर्षांची कन्या. हे एक अजबच रसायन आहे. अतिशय छोटी पण कमालीची धीट अशी ही. तिने आत्तापर्यंत जवळ जवळ ४०-४५ ट्रेक पूर्ण केलेल्या आहेत. भरपूर चालून आम्ही जवळ जवळ १ वाजता चावणी (उंबरखिंड छावणी) ह्या गावात पोहोचलो.. आत्ता जबरदस्त भूक लागली होती म्हणून तिथे एक काकांच्या घरी जेवणाचा बेत झाला.
तिथे मस्त दाबून जेवण झालं. त्यानंतर थोडा आळस येऊ लागला पण तेवढ्यातच शार्दूल दादाने सर्वांना पुढे निघायला सांगितलं. तसाच उठलो आणि गाडीत बसलो म्हटलं इथे तरी अर्धा तास आराम असेल पण लगेच १० मिनिटात आम्ही शॉर्य स्तंभाकडे पोचलो.
तो स्तंभ पाहून सर्व थकवाच निघून गेला. अगदी सुंदर, नदीच्या खोऱ्यात बनवलेलं हे स्तंभ पाहून आम्ही सर्वच सुखावलो. थोडा वेळ एकमेकांचे फोटो काढून नंतर एकत्र आलो. शार्दूल दादा इथे घडलेल्या शेवटच्या लढाईबद्दल final episode सांगू लागला. तेव्हा खरच प्रचिती आली की महाराजांची दूरदृष्टी आणि लष्करी डावपेच किती जबरदस्त होते. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सुदधा महाराजांचे मावळे किती चिवट आणि काटेकोर होती.
थोडक्यात सांगतो.
शाईस्तेखानाची मोहीम स्वराज्यावर चालून आली. स्वतः शाईस्तेखान इथे पुण्यात तळ ठोकून होता. त्याच्या मनात होत की पुण्याची हवा मस्त, इथे शांतीने जगू. दरम्यानच्या काळात त्याने स्वतःच्या मुलीचं सुद्धा लग्न लावून दिल लालमहालात. पण जसजशे औरंगजेबाचे खलिते येऊ लागले तशे शाईस्तेखानाचे धाबे दणाणले. त्याने चाकण च्या किल्ल्याची मोहीम हाती घेतली. तसा हा किल्ला अगदी लहान. पण अवघ्या साडेतीनशे मावळ्यांनी हा किल्ला मोघलांच्या एकवीस हजारच्या फौजेविरुद्ध छपन्न दिवस लढवत ठेवला. त्यावेळी शाईस्तेखानाला त्याची चूक कळू लागली की जर हा इतकासा किल्ला २ महिने मराठे लढवत असतील तर स्वराज्य संपवणे ह्या जन्मात तरी शक्य नाही. शेवटी त्याने कार्तलाबखानाला उत्तर कोकणच्या मोहिमेवर पाठवले. त्याच्या सोबत लढवय्या रायबाघन स्त्री होती. कोकाटे आणि गाढे ह्यांसारखे मराठे सरदारसुद्धा होते. सोबत अंदाजे ३० हजार सैन्य आणि दारुगोळा होता. सैन्य बलाढ्य होते पण तो शत्रूला समजू शकला नाही. समोर महाराजांच वृक युद्ध किंवा गनिमी कावा होता.
पावसाळ्याचे दिवस होते. महाराजांनी कोकणात उतरायच्या दुसर्या रस्त्यांवर आपल सैन्य पेरून ठेवल आहे अशी हूल उडवली आणि थोडी दाखवण्यापुरती झाम्ब्डाझांबड देखील केली. त्यामुळे खांनाच सैन्य उंबरखिंडतूनच पुढे सरकाव अशी महाराजांची योजना कार्याला आली. जस जस सैन्य डोंगर उतरू लागलं रायबाघन ला आपण शत्रूच्या पंजात अडकत चाललो आहोत हे कळू लागलं. रस्ता बराच निमुळता आणि चहुबाजूने डोंगर आहे. महाराजांनी पुढून मागून खानाच्या सैन्याला कोंडीत पकडलं. वरून चारही दिशांनी बाणांचा मारा होत होता. अखेर रायबाघनने कर्तलाब्खानाला समजावून माघार घेण्यास सांगितले. असा महाराजांनी कमीत कमी तीन हजार मावळ्यानिशी तीस हजार सैनिकांना गारद केले ते हि एकही मावळा न गमावता.
हि झाली संक्षिप्त गोष्ट. तर आपण पुढे जाऊ.
तिथून आम्ही निघालो सुधागडाच्या दिशेने. वाटेत ठाकूरवाडीला थांबलो. गाडी सोडली आणि थोडी आवरावर करून चढायला सुरुवात केली. सर्व वजन घेऊन गड चढण हे मला कधीच आवडत नाही. पण तरीही दोन- सव्वादोन चढून गेल्यावर आम्ही म्हळावर पोचलो. गड तसा भरपूर मोठा. ह्याच दुसर नाव भोरापगढ. आख्यायिका अशी आहे कि ह्या गडावर पुरातनकाली भृगु ऋषींचा आश्रम होता आणि त्यांनी इथे भोराई देवीची स्थापना केली म्हणून ह्याच नाव भोरपगढ. पुढे महाराजांनी १६४८ मध्ये ह्याचे नाव बदलून सुधागड असे केले. असे म्हटले जाते कि महाराजांनी राजधानी म्हणून ह्या हि किल्ल्याचा विचार केला होता. इथे महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील काही सदस्यांचे महाल देखील आहेत. रात्री ९ च्या सुमारास आमची जेवण वगैरे आटपली त्यानंतर सर्वच थकले होते म्हणून झोपायची तयारी सुरु झाली. पण आम्ही मित्र इतक्यात झोपणारे नव्हतो म्हणून विरंगुळा म्हणून फोनवर Ludo खेळत चौघेजण बसलो. ११ पर्यंत timepass करून मग आम्ही झोपी गेलो. सकाळी ६ वाजता उठून तयारीला लागलो. तसा हा दिवस निवांत होता. आठ-साडेआठला मस्त मिसळपाव हासडून नंतर गड पाहायला बाहेर पडलो. गडावर बर्याच इमारतींचे अवशेष आहेत. बरेचसे वीरगळ आणि इतरही शिळा आहेत. गडाला असलेला पाच्छापूर च्या दिशेला असलेला महादरवाजा देखील पाहिला. हा महादरवाजा आज जो आपण पाहतोय तो दुर्गप्रेमी संघटनांमुळे. काही वर्षांपूर्वी हा दरवाजा संपूर्णपणे गाळाखाली गाडला गेला होता. गडाला एक टकमक टोक हि आहे. खूपच जबरदस्त. किल्ल्यावरून आपल्याला तैलबैलाचा घाट सुद्धा दिसतो. दुपारच जेवण आटपून आम्ही गड उतरायला लागलो.
IMG_20180225_091903.jpg
खाली पायथ्याशी थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. वाटेत बल्लाळेश्वर ला डोक टेकून आम्ही परतीच्या वाटेवर लागलो.. सोबत ट्रेकच्या आठवणी आणि पुढच्या ट्रेक ची आस घेऊन…..

तात्यारावांना अभिवादन करून ह्या ब्लॉग ची सुरुवात करू

हे मातृभूमी तुजला मन वाहिलेले,
वक्तृत्व वाग्वीभवही तुज अर्पिलेले
तू तेंची अर्पिली कविता नव रसाला
लेखान्प्रती विषय तूची अनन्य झाला
maharashtra desha.jpg